जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती कविता चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना मार्गदर्शन केले. ग्राहकांनी आपल्या तक्रारी स्वतः ऑनलाईन किंवा कार्यालयात येऊन दाखल कराव्यात, यासाठी प्रशासन पूर्णतः सहाय्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करताना, ग्राहक कोण असतो व त्याचे हक्क कोणते आहेत याबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली. “जागरूक ग्राहकच योग्य निवारण मिळवू शकतो,” असा संदेश त्यांनी दिला.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी .