नवी मुंबई एसटी भाडेवाढीवर प्रवासी नाराज, जनसामान्यांचा आक्रोश
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी बघायला मळते आहे. महिलांच्या मते, निवडणुकीदरम्यान 50% सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर भाडेवाढ करणे ठीक परंतू तरी बस वेळेवर चालणे, बसेसची संख्या वाढवणे, आणि प्रवास सुरक्षित करणे या सेवा सुधारण्याची मागणी महिला करत आहे.
अनेक ग्रामीण भागांमध्ये एसटी बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांनी ती लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
सरकारने भाडेवाढ लागू करताना सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा केली पाहिजे. नागरिकांचा आक्रोश लक्षात घेऊन तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य न्युज, मुंबई, स्वातंत्र्य न्यूज # न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.