
मुंबई, दि. १५:
युपीएससीद्वारे घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबईतर्फे विशेष मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र ४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे, अशी माहिती SIAC संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी दिली.
प्रशिक्षण सत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
प्रशिक्षण सत्राचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० जानेवारी २०२५ पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबावी:
- ई-मेलद्वारे अर्ज: इच्छुकांनी आपले अर्ज siac@1915@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
- संकेतस्थळावर मार्गदर्शन: अर्जासाठी आवश्यक सूचनांसाठी www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- संपर्क: अधिक माहितीसाठी ०२२-२२०७०९४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
मुलाखत प्रशिक्षण सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सत्रात मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, आणि प्रश्नमालिका यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असेल.
SIAC चा उद्देश
राज्यातील विद्यार्थ्यांना नागरी सेवांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा SIAC चा उद्देश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी आवश्यक ती तयारी करण्यात मोठी मदत होईल.
राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन SIAC संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी केले आहे.
#swatantryanews#marathinews#maharashtra#