केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेची 10 वी वर्षगाठ साजरी करण्यात आली. यानिमित्ताने केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अनुपूर्णा यांनी हा उपक्रम केवळ नारा नसून, समाजाला जागरूक करण्याचा दृढ संकल्प असल्याचे म्हटले आहे.
योजनेचा उद्देश: मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे आणि लिंग समानता प्रस्थापित करणे.
समाजामध्ये मुलींच्या सन्मानासाठी सकारात्मक विचारधारा रुजवणे.
जनजागृतीसाठी सरकारी यंत्रणा आणि जनतेचा सहभाग वाढविणे.
गेल्या दशकात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना मोठी भूमिका बजावत आहे.
केंद्रीय मंत्री अनुपूर्णा यांच्या मते, हा उपक्रम समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न असून, मुलींच्या अस्तित्व आणि अधिकारांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.